बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अनुक्रमणिका



१. बलिप्रतिपदा



अ. कथा :
हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथि जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये; पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान. मुंजा मुलगा लहान असतो व तो `ॐ भवति भिक्षां देही ।' म्हणजे `भिक्षा द्या' असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ``काय हवे ?'' तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलिराजाने त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले. तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ``तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)'', असे बलिराजास सांगितले. तेव्हा `आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे', असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते; मात्र शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून. अभक्ष्यभक्षण, अपेयपान व अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात) पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशी ही दिवाळी. बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बलि व त्याची पत्‍नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात.

आ. विक्रम संवत् वर्षारंभ दिन



२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये

अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वत:च्या अंत:करणाचे निरीक्षण करा.

आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.

इ. या दिवशी बर्‍याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.

ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु व सत्यनारायण यांच्या) भक्‍तांना जास्तीतजास्त फायदा होतो.)

साधकांनो, या दिवशी माझे तत्त्व जास्तीतजास्त येणार असल्याने तुमच्यातील तळमळ व भक्‍ती वाढवून त्याचा फायदा करून घ्या.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १०.१०.२००५, सकाळी ११.१३)


३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती



हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी बलीची पूजा सर्वप्रथम का करावी, तसेच कालचक्राबाबत सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांना एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती येथे देत आहोत.

अ. पाताळातून येणार्‍या लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे बलीची पूजा सर्वप्रथम करावी !
पाताळातून येणार्‍या सर्व लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे लहरींवर नियंत्रण असलेल्या घटकाचीच सर्वप्रथम पूजा केल्यास भोगाने तृप्‍त झालेला घटक अन्य घटकांना नियंत्रित करून ठेवतो. तसेच एक-एक करून तो सर्वच घटकांना भोग पुरवतो; म्हणून सर्वप्रथम बलीची पूजा करण्याचे शास्त्र (विधान) आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.०४)

आ. बलिप्रतिपदेचा दिवस साडेतीन मुहूर्तांमध्ये गणला जाण्यामागील कारण
१. मुहूर्त : ज्या दिवशी गतीमान कालचक्रातील व्यासकता संपूर्णतेला, म्हणजेच प्रत्यक्ष उत्पत्ती बिंदूच्या व्यासत्वावर असलेल्या अवस्थेत उत्पत्ती बिंदूच्या संपर्कात येऊन पुन: व्यासत्वाच्या स्वरूपात गतीमान होण्यास सुरुवात होते, त्या काळाला, म्हणजेच प्रत्यक्ष काळाच्या नूतनतेच्या वेळी कार्यरत झालेल्या गतीमततेतील व्यासत्वातून कार्यरत होणार्‍या दिवसाला `मुहूर्त' असे म्हटले जाते.
२. महाकालचक्रातील तत्त्वाचे व ईश्‍वरी शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राखण्यासाठी साडेतीन मुहूर्त साजरे केले जाणे :
इच्छा, क्रिया, ज्ञान आणि धर्म या प्रकारच्या चार घटकांच्या निमित्ताने साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात. मुहूर्त ही संकल्पना प्रत्यक्ष कालचक्राच्या अनुषंगाने आहे. कालचक्र म्हणजे ईश्‍वराने निर्मिलेल्या सृष्टीच्या संहारकतेकडे होत असलेल्या प्रवासाची प्रत्यक्ष गती स्वरूपातील गणना. साडेतीन मुहूर्तातील पहिला मुहूर्त हा कालचक्राच्या इच्छा स्वरूपातील पूर्णतेचा, दुसरा मुहूर्त क्रिया स्वरूपाच्या पूर्ततेचा, तिसरा मुहूर्त ज्ञान स्वरूपाच्या पूर्ततेचा, तर अर्धा मुहूर्त धर्माच्या अर्ध पूर्णतेतून लयाकडे होत असलेल्या समावेशकतेचा दर्शक आहे. ज्या दिवशी महाकालचक्राच्या एक एक अंगाची पूर्णत्वता एक एक बिंदूशी निगडित होते, त्या दिवशी त्या त्या तत्त्वाचे बाहुल्य असते. कालाच्या प्रत्येक उपखंडाच्या त्या त्या उपखंडात त्या त्या दिवशी ईश्‍वराची ती ती शक्‍ती कार्यरत होत असल्यामुळे त्या त्या शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राहून जीवस्थिती स्वरूपात, म्हणजेच वर्तमानकाळात राहून त्या त्या तत्त्वाचा प्रत्यक्ष लाभ व्हावा; म्हणून साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.५२)
३. इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती यांच्या बलावर प्राप्‍त झालेल्या कालाला पूर्णकता कालचक्राच्या व्यासाला पूर्णत्वातून उच्चपूर्णत्वाकडे नेते; म्हणून तीन मुहूर्त हे पूर्ण दिवसाचे गणले जातात, तर धर्मशक्‍ती ही परिपूर्णत्व वाचकसंज्ञेतून अपूर्णत्व वाचकतेशी निगडित संज्ञेकडे, म्हणजेच ईश्‍वराकडे कालाच्या व्यासाला नेत असल्यामुळे त्या दिवसाला अर्धा म्हणून साजरा केला जातो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.०७)

इ. कालचक्राचा प्रवास
श्री. निषाद देशमुख : इच्छाशक्‍तीतून कालचक्राचा प्रवास सुरू होऊन तो क्रियाशक्‍तीद्वारे पूर्णत्वाला गेला, क्रियाशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास ज्ञानशक्‍तीतून पूर्णत्वाकडे गेला व ज्ञानशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास धर्मशक्‍तीतून पूर्णतेकडे गेला, असे आहे का ?
एक ज्ञानी : नाही.
१. सत्ययुगाची सुरुवात : ईश्‍वराच्या इच्छाशक्‍तीने संकल्पशक्‍तीचे सगुण कार्यजन्यात्मक स्वरूप धरून सृष्टीउत्पत्ती ईश्‍वराच्या निर्गुणात्मक सगुण इच्छाशक्‍तीच्या प्रत्यक्ष प्रभावलयतेच्या आधारभूतात्मकतेच्या वर गेली व सत्ययुगाची सुरुवात झाली.
२. त्रेतायुगाची सुरुवात : पुढे सगुणातून कार्यरत झालेल्या इच्छाशक्‍तीने सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण, निर्गुण आणि निर्गुणातीत रूपाच्या एकानंतर एक, अशा श्रेष्ठतम स्तरावर त्या त्या स्तरावरच्या स्वरूपात्मक बोधतेतील कार्यजन्यता घेऊन निर्गुणात्मकता, म्हणजेच शून्यकतेवर आधारित असलेल्या निर्गुणजन्यात्मकतेप्रमाणे सगुणात्मक चालनात्मकतेशी निगडित स्तरावर सत्ययुगाची पूर्णता करून प्रभावलयतेच्या स्वरूपात क्रियाशक्‍तीच्या निर्गुणावर आधारलेले स्वरूप घेऊन त्रेतायुगाची सुरुवात झाली.
३. द्वापारयुगाची सुरुवात : त्यानंतर शक्‍तीतील त्या त्या उच्चकता कालाच्या प्रवाहमानकतेच्या आधारे घेऊन ज्ञानशक्‍तीच्या स्वरूपात द्वापारयुगाची सुरुवात झाली.
४. कलीयुगाची सुरुवात : त्यानंतर धर्मशक्‍तीच्या स्वरूपात कलीयुगाची सुरुवात केली.
(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, तर धर्मशक्‍ती अपूर्णत्वाशी संबंधित असणे : प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या प्रकारच्या पूर्णत्वाशी निगडित प्रत्यक्ष उपात्मक (म्हणजेच उप-उप स्वरूपावर त्या त्या स्तराला धरून कार्य करणारी) स्वरूपाचे कार्य करण्यासही सक्षम असल्याने त्या त्या स्वरूपात कार्य करून प्रत्यक्ष कालाला पूर्णत्वाची परिपूर्णता प्रदत्त केली. याउलट धर्माची अपूर्णात्मकता (अपूर्ण म्हणजेच ज्याला पूर्णत्वाने व्यापू शकत नाही, अशा ईश्‍वरापासून निर्मिती झालेली असल्यामुळे) हाच गुणधर्म असल्यामुळे धर्मशक्‍तीच्या बलावर कलीयुगाची समाप्‍ती होऊन पूर्ण कालचक्र ईश्‍वरात विलीन होईल. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

ई. कलीयुगाच्या समाप्‍तीच्या दिवस बलिप्रतिपदा असेल : सध्याच्या सत्ययुगातून कलीयुगापर्यंतच्या समाप्‍तीचा दिवस बलिप्रतिपदा, म्हणजेच धर्मशक्‍तीच्या स्वरूपातून निर्गुणकतेकडे नेणारा दिवस असेल. या दिवशी श्रीविष्णूचा दहावा अवतार कल्की आसुरी शक्‍तीचा शेवट करून पूर्ण सृष्टीला ईश्‍वरात विलीन करील.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी २.२१)

उ. धर्मपालनामुळे ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होऊन ईश्‍वर जिवाला उच्च स्थानावर नेतो !विश्‍वाच्या स्थितीधारकतेसाठी कार्यरत होणार्‍या प्रत्यक्ष मानवबलामध्ये ईश्‍वरी शक्‍तीची जागृती होऊन कर्माच्या फलनिष्पतीत जिवाला प्रत्यक्ष ईश्‍वराशी सहज स्तरावर एकरूपता गाठता यावी, यासाठी बुद्धीगम्य कर्माच्या माध्यमातून बुद्धीअगम्य कार्य करणार्‍या स्थूल घटकाशी निगडित विधींचा समावेश केला आहे. धर्म स्वत:च्या प्रत्यक्ष कर्मस्वरूपमय वलयातून ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण करून प्रत्यक्ष मानवाची जागृती आणि विश्‍वाच्या स्थितीतील प्रत्यक्ष ईश्‍वरी ऊर्जेचे माध्यमदर्शक प्रक्षेपण ही दोन्ही कर्मे जिवात करून जिवाला उच्च स्तरावर नेतो; म्हणून हिंदु धर्मामध्ये धर्मपालनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आले आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी ९.३४)


४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !

`विष्णूने अनन्य भक्‍त असुराधिपती बलीवर अन्याय केला. असा कसा तो परमात्मा विष्णु ? त्याला करुणामय कसे म्हणावे ? बलीने अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्‍त झाले. देव व ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली; पण बली हा भोगार्थी नाही, तर मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धी देणारा विष्णु (बटुवामन) त्याच्या यज्ञात आला आणि केवळ भोगाकरिता दीन झालेल्या व त्यामुळे अथवा असे करण्यास योग्य असलेल्या वडील बंधू इंद्राला जगताचा तुकडा देण्याच्या उद्देशाने, बलीला बाह्यदृष्ट्या फसवून; पण अंतरदृष्ट्या त्याचे कोटीकल्याण करून, त्या पापहारक हरीने, मायाबलाने तीन पावलांनी तिन्ही भुवने त्याच्यापासून हिरावून घेतली व त्याला पाताळातले राज्य दिले; पण बलीचे प्रारब्ध त्याला इंद्रत्व देणार आहे. तो त्याकरिता शरीर धारण करून जीवन्मुक्‍त स्थितीत आहे.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


५. ।। मंगलाचरण ।।

`आपले कल्याण असो !'

`आपले स्वागत आहे !!'

`मी याचक आहे.'

`प्रभू ! मी आपली काय सेवा करू ?'

`मला जमीन हवी !'

`किती ?'

`माझ्या पावलाने, ...तीन पावले !'

`दिली !!'

`संकल्प जल हातावर द्या !'

शुक्राचार्य सांगतात, `बलीराजा देऊ नको !...याचक भिक्षुक नाही, साक्षात् `विष्णु' आहे.'

बली म्हणाले, `साक्षात विष्णूपेक्षा श्रेष्ठ असा दान देण्याला पात्र कोण असू शकतो ?'

अशा प्रकारे राजा बलीच्या यज्ञारंभी पूजीत झालेला वामन भगवंत आम्हा सर्वांचे नेहमी रक्षण करो !!

(श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार, पृ. ३ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ))

Read more...

भाऊबीज (यमद्वितीया)(कार्तिक शुद्ध द्वितीया)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अनुक्रमणिका



१. कथा व विधी

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे.


या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते')


२. बहीण नसलेल्या भावाने अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यामागील शास्त्र

यमलहरींना प्रत्यक्ष संचारण्यासाठी बल देणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य असल्यामुळे शास्त्रात बहीण नसलेल्या भावालाही अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यासाठी सांगितलेले असणे

धर्मात सांगण्यात आलेले कर्तव्य हे जिवाच्या व्यष्टी, तसेच समाजाच्या समष्टी या दोन्ही घटकांना प्रत्यक्ष ऊर्जाबल पुरवून त्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करत असल्यामुळे धर्मात सांगण्यात आलेले कर्म करणे, हे प्रत्येक जिवाचे कर्तव्य ठरते. यमलहरींना प्रत्यक्ष संचार करण्यासाठी बल देणे, म्हणजेच प्रत्यक्ष सृष्टीकर्मात ईश्‍वराने ठरवलेले आपले कर्तव्य पार पडणे असल्यामुळे `भाऊबिजेच्या दिवशी बहीण नसलेल्या भावानेही अन्य स्त्रीला बहीण समजून तिच्या घरी जेवण्यासाठी जावे', असे धर्माने सांगितले आहे. बहीण नसलेल्या पुरुषाद्वारे अन्य स्त्रीला बहीण मानून तिच्या घरी जाऊन भोजन करणे म्हणजेच `मनुष्याने धर्मासाठी आपले पूर्ण कर्तव्य पार पाडणे', असे म्हटले जाते. अशा प्रकारे धर्मासाठी पूर्ण प्राणपणाने कर्म करणार्‍या जिवाची उन्नती लवकर होते.
- (श्री. निषाद देशमुख यांना चिंतनाच्या माध्यमातून मिळालेली माहिती, १२.१०.२००६, सकाळी ११.३६)


३. यमलहरींना प्रत्यक्ष ऊर्जाबलता न पुरवल्यास जिवाला होणारे तोटे

अ. प्रत्यक्ष संचार करणार्‍या यमलहरींना पुढे नेणारे क्रियाबल न पुरवल्यामुळे जिवाचा लिंगदेह खूप काळासाठी अडकलेल्या अवस्थेत भुवलोक किंवा अन्य योनी यांत रहातो.
आ. जिवावर यमदेव रुष्ट झाल्यामुळे त्याच्या प्रकोपस्वरूपी प्रत्यक्ष मृत्यूलहरींचे प्रक्षेपण जिवाच्या कालचक्रावर झाल्यामुळे त्याला अकालमृत्यूचा अंगीकार करावा लागतो किंवा त्याला सतत लयदर्शकात्मक घटनांचा सामना करावा लागतो.
इ. जिवाच्या देहात प्रत्यक्ष भोगासाठी आकृष्ट झालेल्या लहरींची तृप्‍तता न झाल्यामुळे त्या लहरींच्या विघटनजन्य प्रक्षेपणामुळे त्याच्या शरीरात विविध ठिकाणी दाब निर्माण होऊन त्याला शरीरात विविध ठिकाणी दुखणे, हृदयविकार होणे, तो बेशुद्ध पडणे, अशा प्रकाराचे त्रास होतात.
ई. जिवाद्वारे प्रत्यक्ष धर्मस्वरूपाची व ईश्‍वरवाचक संज्ञेची अवज्ञा झाल्यामुळे त्याला धर्मदंड भोगावा लागतो.
उ. जिवाने सृष्टीच्या संचालनासाठी सहकार्य न केल्यामुळे त्याला समष्टी पाप भोगावे लागते.
ऊ. भाऊबिजेसारख्या सणाच्या माध्यमातून जिवाला समाजऋण व देवऋण फेडता येते. याउलट भाऊबीज साजरी न केल्यास जिवाला समाजऋण व देवऋण फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.४९)


४. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण, धार्मिक कृती आदींच्या माध्यमातून जिवाला सर्व प्रकारचे ऋण फेडणे शक्य होणे

भारतीय संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले विविध सण, विधी आदींच्या माध्यमातून जिवावर असलेले देव, पितर, समाज आणि ऋषी ऋण फेडले जातात. साधना न करणार्‍या जिवालापण हे सर्व ऋण फेडणे शक्य व्हावे; म्हणून विविध कालखंडांत विविध प्रकाराच्या धार्मिक कृती, सण, धार्मिक विधी साजरे करण्याचे नियम घातले गेले आहेत. - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.५४)



Read more...

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अभ्यंगस्नानाचे परिणाम दर्शवणारे चित्र





कृती : व्यक्‍तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवावी.

इतर सूत्रे
१. प्रथम शरिराला तेल लावल्यामुळे त्वचेतील रंध्रांतून शक्‍तीचे कण देहात पसरतात.
२. देहाला तेलमिश्रीत उटणे लावल्यामुळे देहात शक्‍तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात, तर अभ्यंगस्नान करतांना चैतन्याची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
३. नेहमीच्या आंघोळीपेक्षा नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने ५ टक्के अधिक लाभ होतो आणि वरील स्पंदने अधिक काळ देहात टिकून रहातात.
http://www.sanatan.org/mr/a/cid_144.html
Read more...