गुढी उभारण्याचे फायदे कोणते ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गुढी उभारण्याचे फायदे कोणते ?


गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति-लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे. प्रजापति-लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति-लहरी आपल्याला प्राप्‍त होतात.

पंचांगश्रवण : `ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्यायाकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करतात.
फायदे तिथेश्च श्रीकरं प्रोक्‍तं वारादायुष्यवर्धनम् ।नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ।।करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चा्गफलमुत्तमम् ।एतेषां श्रवणान्नित्यं ग्गास्नानफलं लभेत् ।।अर्थ : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो, योगश्रवणाने रोग जातो, करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल सांगितले आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फळ मिळते.


'(संदर्भ : सनातनचे प्रकाशन, `सण, धार्मिक उत्सव व व्रते')




गुढीपाडव्या आध्यात्मिक माहिती - वाचण्यासाठी येथे टिचकी

वरील माहिती इंग्रजी ( English) मध्ये वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

Read more...